प्रवचन ऎकताना आणि विशेषत: त्या प्रवचनात आपल्या वर्तणूकीबद्दल उपदेश असतील, तर त्यावेळी पुढे येऊन बसलेलं आपलं एक मन हळू हळू मागे जाऊन बसतं. पार मागे बसून राहतं. असं करण्यात आपल्या मनाची चूक किती आणि त्या प्रवचनात सांगितल्या जाणार्या उपदेशातली बडबड कोणती असते ?…’तू पापी आहेस, तू पाप कबूल कर तो तुला निश्चित क्षमा करणार’, किंवा ‘आपलं मन षडरिपूंनी भरलेलं आहे’, ‘जग हे माया आहे’ वगैरे ऎकायला मिळालं, की आपली गडबड होते. अपराधीवृत्तीने आपण विचलीत होतो आणि मागे जाऊन बसतो.;नाही का ? आपल्या पापांच्या हिशोबाने अन पुण्याच्या तणावाने आपल्या मनावरचा आपला विश्वास उडत जातो. आणि मग बर्याच कालानंतर आपण सावरून जातो. आपल्या लक्षात आलेलं असतं, की –
कही गीता का हवाला कही कुरान का था
उनकी हर बात में खतरा मेरी ईमान का था
धर्मग्रंथांचे हवाले देऊन आपल्याला ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न होत असतात. आपली श्रध्दा, आपल्या सच्चेपणाबद्दल ते शंका घेतात, अन खरं म्हणजे, आपण बिघडलेलोच आहोत, हा पक्का विचार ठेऊनच त्यांचे उपदेशांचे डोस चालू असतात. ईश्वराची भावना आपल्या मनात दडपन तयार करते.
आणि आयुष्यभर प्रवचनं ऎकल्यावर, पोथीपुराणं वाचल्यावर एका टप्प्यावर माणसाला कळून येतं, की एकमेकांबद्दलचा बंधुभाव हेच तर सार आहे, धार्मिक ग्रंथांचं. आणि हेच तर सांगायला हवं सगळ्या प्रवचनांतून-
चाहे गीता बाचिए, या पढीए कुरान
मेरा तेरा प्यार ही, हर पुस्तक का ग्यान
– निदा फाजली
“पुढे येऊन बसलेलं आपलं एक मन हळू हळू मागे जाऊन बसतं. पार मागे बसून राहतं”. vaa vaa. je pravachan kiva bhashan yaavar aaplya manat dwand asta tithe kharach apla man shevati basun tirpee man karoon bhashan ekt ast. Vaa faarch chaan kalpana ahhe.
खतरा ईमान का था….ह्या ठिकाणी कतरा ईमान का था , असे सुद्धा आशयाच्या दृष्टीने बेमालूमपणे बसू शकते. खैर खतराच मुळात असावे .
आपले प्रवचन आवडले.