Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मार्च, 2012

आपण दररोज आरशात पाहून भांग वगैरे पाडून कामाला लागतो; पण आपल्या चेहर्याेकडे खरंच आपलं लक्ष असतं की नाही कुणाला ठावूक ! हाताच्या रेषांचंही तसंच असतं. या हातांच्या रेषांचं गणित सोडवायचा आपला अधून मधून प्रयत्न होतो, पण केव्हा ? हतबल होवून जेव्हा हात चोळत बसायची वेळ येते तेव्हा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, आपण आपल्या भविष्याशी निगडीत करून ठेवलेल्या आपल्या या हातच्या रेषा…आपलं भविष्य मूठीत धरून ठेवणार्याआ- आपलेच हात, आपलेच भविष्य; पण आपल्याला त्याचा पत्ता ? छे !
एखादी तीव्र इच्छा जेव्हा आपल्याला छळत असते, तेव्हा या हातच्या रेषांकडे आपण मोठ्या आशेने पाहात असतो. एक शायर म्हणतो-
तूम मेरी रूह में शामिल हो, रगों में रवां हो
मगर मेरी हाथों की लकिरों में कहां हो…
…माझ्या मनात- माझ्या आत्म्यात तू भरून आहेस, माझ्या नसानसात तू वाहते आहेस….पण खरंच, तू माझ्या नशिबात कुठे आहेस बरं… एखाद्या धुंदीने माणूस झपाटलं, की त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने मोठं काम करून दाखवितो हा आपल्या सगळ्यांचाच अनुभव. ते काम हातून वेगळं झालं, की कधी आपल्याला आचंबा वाटतो, की अरे ! खरंच का हे आपल्या हातून झालेलं आहे…. आणि आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, की आपण हतबल होवून जातो. आपला आत्मविश्वास कमी होवून जातो. त्यावेळी आपल्या यशाच्या घटना आपण आठवतो…वाटून जातं-
बा-अमल चूम चुके चांद सितारों की जबीं
बे-अमल हाथ की रेखा में मुकद्दर देखे
बा- अमल, बे-अमल… अमल म्हणजे अधिकार, प्रभाव, परिणाम. आणि या शब्दासोबत ‘बा’ असलं की ते होतं प्रभावासहित, अधिकारवाणीने; आणि हाच अमल, बे-अमल झाला, की ती होते हाता बाहेर गेलेली- हाताच्या रेषेबाहेर गेलेली बाब. प्रभावहीन.
बा-अमल आणि बे-अमल ह्याच तर रेषा आहेत आपल्या हाताच्या आडव्या उभ्या.

Read Full Post »

प्रवचन ऎकताना आणि विशेषत: त्या प्रवचनात आपल्या वर्तणूकीबद्दल उपदेश असतील, तर त्यावेळी पुढे येऊन बसलेलं आपलं एक मन हळू हळू मागे जाऊन बसतं. पार मागे बसून राहतं. असं करण्यात आपल्या मनाची चूक किती आणि त्या प्रवचनात सांगितल्या जाणार्‍या उपदेशातली  बडबड कोणती असते ?…’तू पापी आहेस, तू पाप कबूल कर तो तुला निश्चित क्षमा करणार’, किंवा ‘आपलं मन षडरिपूंनी भरलेलं आहे’, ‘जग हे माया आहे’ वगैरे ऎकायला मिळालं, की आपली गडबड होते. अपराधीवृत्तीने आपण विचलीत होतो आणि मागे जाऊन बसतो.;नाही का ? आपल्या पापांच्या हिशोबाने अन पुण्याच्या तणावाने आपल्या मनावरचा  आपला विश्वास उडत जातो. आणि मग बर्‍याच कालानंतर आपण सावरून जातो. आपल्या लक्षात आलेलं असतं, की –

कही गीता का हवाला कही कुरान का था
उनकी हर बात में खतरा मेरी ईमान का था

धर्मग्रंथांचे हवाले देऊन आपल्याला ताळ्यावर आणण्याचे प्रयत्न होत असतात. आपली श्रध्दा, आपल्या सच्चेपणाबद्दल ते शंका घेतात, अन खरं म्हणजे, आपण बिघडलेलोच आहोत, हा पक्का विचार ठेऊनच त्यांचे उपदेशांचे डोस चालू असतात. ईश्वराची भावना आपल्या मनात दडपन तयार करते.

आणि आयुष्यभर प्रवचनं ऎकल्यावर,  पोथीपुराणं वाचल्यावर एका टप्प्यावर माणसाला कळून येतं, की एकमेकांबद्दलचा बंधुभाव हेच तर सार आहे, धार्मिक ग्रंथांचं. आणि हेच तर सांगायला हवं सगळ्या प्रवचनांतून-

चाहे गीता बाचिए, या पढीए कुरान
मेरा तेरा प्यार ही, हर पुस्तक का ग्यान
– निदा फाजली


Read Full Post »