15 नोव्हेबरच्या टिपणाच्या अनुषंगाने…
बुध्दी आणि भावना यांचे द्वंद्व माणसाची फार तारांबळ करतं. हो, याला तारांबळच म्हणावी लागेल. या तारांबळीध्ये अस्वस्थाता असते,उत्तेजना असते, मात्र केवळ भावनेमुळॆ ही तारांबळ नकोशी न वाटता हवीहवीशी वाटत असते. बरं, माणसाच्या प्रकृतीत कधी बुध्दीला प्राधान्य देण्याची वृत्ती असते, तर काहीजणांच्या बाबतीत भावनेच्या आधाराने वागायची-बोलायची सवय.
…हे द्वंद्व तारूण्याच्या उंबरठ्याशी तर अधिक होऊन जातं. प्रेमाच्या व्यवहारात कधी ही बुध्दी- अक्कल आपल्याला बजावीत असते तर कधी ही ओढ….आपल्याला स्थीर राहू देत नसते. ‘ताज महल’ मध्ये साहिरच्या एका गाण्यात ती नायिक म्हणते-
शर्म रोके है इधर, शौक उधर खिंचे है
क्या खबर थी, कभी इस दिल की ये हालत होगी
अगदी अशीच अवस्था ‘नौ बहार’ या जुन्या चित्रपटात शैलेंद्र ने मांडली आहे. ( ताज महल आणि नौ बहार चे संगितकार आहेत रोशन.)
बचपन जवानी जो मिलने लगे है
मौसम बिना फूल खिलने लगे है
छेडी किसीने मेरे मन की बिना-
गाऊं तो मुश्किल न गाऊं तो मुश्किल
ते गाणंच आपण पाहू या…बुध्दी आणि भावना यांची सुरेख दंगल असलेलं…
प्रतिक्रिया व्यक्त करा