जीएंच्या एका कथेत नायक गावाबाहेर असलेल्या जंगलात एका गोसाव्याला भेटतो. या गोसाव्याबद्दल त्याने ऎकलेलं असतं,की याला भविष्य स्पष्ट दिसत असतं. माणसाचं सगळं भविष्य तो स्पष्ट पाहू शकत होता. एका ठिकाणी बसलेला भल्या मोठ्य दाढी मिशा असलेला हा गोसावी; नायक त्याला विचारतो, तू भविष्य जर एवढे स्पष्ट सांगतोस तर गावातल्या लोकांनी तुला एवढ्या बाहेर का बरं आणून बसविलं…. गोसावी त्याला आपल्या छातीवरची दाढी बाजूला काढून दाखवितो-सगळ्या छातीवर डोळे असतात. गोसावी सांगतो, ‘माणसाला भविष्य हवं असतं, पण भविष्याकडे निर्देश करणारं फक्त. सरळ स्पष्ट भविष्य कुणालाच नको असतं.’ हे स्पष्ट भविष्य म्हणजे लखलखीत सत्य. कुणाला पाहिजे असतं… ते सोसणारं असतं का माणसाला… माणसाला सत्य पाहिजे असतं, ते गुळमट; विषेशत: त्याच्याबद्दल काही सकारात्मक असेल तरच. नसता सत्त्याचा गळा घोटायला तो मागे पुढे पहाणारा नसतो.
….एका उर्दू शायरने म्हटलं आहे-
मेरे हातों ही मेरा कत्ल होगा,
मेरी बातों में सच्चाई बहोत है
खरंच, आपल्याला सत्त्य-स्पष्ट असं पाहिजे असतं का बरं… आपण सत्त्याचा उदो उदो करतो, मी खरंच सांगतो, मी कधी खोटं बोलत नाही, असं आपण नेहमी म्हणतो, खरंच का बरं आपण सत्त्य तेच बोलत असतो..विशेष म्हणजे खरंच का आपल्याला निर्मळ सत्त्य असं हवं असतं… त्या सत्त्यात जर आपला अहंकार गोंजारणारं काही नसेल तर ते आपल्याला रूचेल का,पटेल का…
आणखी एका शायरने म्हटलं आहे-
मजा देखा मियां सच बोलने का
जिधर तूम हो उधर कोई नही है
सत्त्याला सोसणं
ऑक्टोबर 15, 2011 Madhukar Dharmapurikar द्वारा
ata ya lekhavar kay comment dyave?