कोणत्याही धर्मातले धर्मगुरू खरं म्हणजे, चांगले असतात. त्यांचा आपल्याला त्रास नसतो. ते काही घरी येवून आपला कान धरून तिकडे घेवून जात नसतात प्रवचनाला. किंवा प्रवचनादरम्यान प्रश्न विचारून उत्तर नाही आलं, तर ना आपल्याला छड्या मारतात ना रागावतात ना अपमानित करतात. शिवाय ते बिचारे काही गृहपाठही देत नाहीत,आभ्यास करून येण्याबद्दल दटावतही नाहीत. ते आपापलं सांगत राहतात बिचारे- दु:ख विवंचनांना टाळण्यासाठी तो आध्यात्माचा-देवाचा रस्ता.
मग असं असताना, आपण का बरं नावं ठेवावीत ? का बरं त्यांची टिंगल करावी ? का बरं ? याचं खरं कारण म्हणजे, हा जो धर्मगुरू-ज्याला आपण हौसेने आणलेलं असतं आपणच आपल्या मनात. त्याची त्याची प्रतिष्ठापना केलेली असते उत्साहाने,उतावीळपणाने; आणि मग गणेश चतूर्थीचा उत्साह दुस-या.-तिस-या दिवशी ओसरावा अन मग दररोजच्या आरतीचे टेंशन यावे असे होवून जावे. गणपती तर निघून जातो बिचारा आठ दहा दिवसात; पण मनात बसलेला हा धर्मागुरू- धार्मिक,आध्यात्मिक भावनांची समज- ती कुठे निघून जाते ? त्याच्यासोबत रहाणं शक्य नसतं आणि मग त्याच्याबद्दलच्या तक्रारी सुरू होतात. त्याला नावं ठेवणं सुरू होतं. पहाता पहाता त्या तशा थट्टेत माणूस रमून जातो. ती थट्टा रुचकर वाटायला लागते. विशेषत: ‘संध्याकाळ’ च्या सवयीचा माणूस तर या थट्टेत अधिक आक्रमक होत असतो. कुणी तर ईश्वराचीही थट्टा करायला मागे पुढे पहात नाही. एक विनोद आहे :
एक फकीर भीक (खैरात ) मागण्यासाठी मशिदीसमोर कटोरा घेऊन उभा रहातो. सगळे नमाजी निघून जातात त्याला कुणी काही टाकत नाही. मग तो फकीर मंदिरासमोर येऊन उभा रहातो. तिथेही कुणी त्याला भीक घालीत नाही. मग तो चर्चसमोर उभा रहातो. तिथेही तसाच अनुभव. मग तो शराबखान्यासमोर येऊन उभा रहातो; तर तिथून जे जे शराबी बाहेर पडतात ते त्याला काही ना काही देवून जातात. त्याचा कटोरा भरतो. फकीर मग आभाळाकडे पाहून म्हणतो- “वाह मेरे मौला ! रहते कहा हो, और पता कहा का देते हो !”
मिर्जा गालिब म्हणतो,
कहां मैखाने का दरवाजा गालिब और कहां वाईज
पर इतना जानते थे कल वो जाता था के हम निकले
‘अकबर’इलाहाबादी तर या शैखची गंभीरपणे थट्टा करतात
शैख जी रात को मस्जिद में नही जाते है
यानी डरते है के बैठा कही अल्लाह न हो
म्हणजे, माणूस आणि ( धर्मगुरू ?) भुताला अन ईश्वराला रात्री भीतो की काय ?
बिघडलेला माणूस अधिकाधिक बिघडत जातो, पिन्याच्या सवयीचा होत जातो, तसतसं त्याला आतून त्याची सदसद्विवेक बुध्दी सतावीत रहाते. मग तो आपला राग या धर्मगुरूवर काढतो. त्याला शिकवायलाही कमी करीत नाही-
जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर
या वो जगह बता दे, जहां पर खुदा न हो
अशा पिण्यामुळे वाईट कृत्यांमुळे माणसाला स्वर्ग लाभत नाही, तो नरकात जातो असं तो शैख वारंवार बजावत असतो. पण शराबखान्यात बसलेला शायर काय म्हणतो
खैर दोजख में शराब मिले ना मिले
शैख साहब से तो जां छूट जाएगी
keval aprateem. yaa madhushalechaa ferfataka avadalaa. Nimitt dharmaguru asale taree, nemake panaane vyakt jhaale aahe. We always mispost the letters, not because the address is incorrect…He is in the habit of changing the
place….Likhate raho…Madhukarrao…
Khoop chhan .Fakiracha kissa farach majeshir ahe.
blog chhan ahe shevatcha sher aprateem. yaach moodchi ek gazal Jaggitsingh ne gaayli ahe . shair mhanato–
” gharse hum nikale the masjid ki taraf jaane ko
rind bahakake hume le gaye maikhane ko ,
” aaj kuchh aur bhi pee loon ke soona hain maine
aate hain hazaraten waais mere samazane ko ”
Congrats to your style of putting a serious issue in a lighter mood and yet convey the subtle message.
Thanks !