Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जानेवारी, 2011

बेजूबानी…

प्रेम; आणि तक्रार नाही,हे असं कसं होईल ? प्रेमात तक्रार तर असतेच शिवाय या शिकवा-शिकायत मध्ये एक प्रकारची अवीट गोडीही असते.
पण हे कुणाला लागू होतं? जेव्हा दोघंही एकमेकांवर अगदी फिदा असतात त्यांनाच.
सहसा प्रेम हे एकतर्फी असतं. आणि मग अशा स्थितीत तक्रार करायला गेलं, की ऎकून तर घेतल्या जातच नाही,शिवाय नाराजी वाढत रहाते. अबोला बाळगल्या जातो. मग तो प्रियकर दिवस रात्र बेचैन होतो, ती भेटली की तेच तेच सांगत रहातो.तिला त्याच्या सांगण्याबोलण्यावर भरवसा रहात नाही आणि मग हळू हळू प्रेमाचं रुपांतर एका दाहक अशा अनुभवामध्ये होतं. त्याला गप्पपणा घेरतो. तो मग तिला म्हणतो-
हश्र के दिन मेरी चुप का माजरा,
कुछ न कुछ तुमसे भी पुछा जाएगा

त्याला ही खात्री आहे, की प्रलयाच्या दिवशी-ज्या वेळी पापा पुण्याचा हिशोब होईल, माणसाच्या कृत्यांचा जेव्हा पाढा वाचल्या जाईल, तेव्हा ‘हा का बरं गप्प आहे ?’ असा प्रश्न तुला विचारला जाईल. नक्कीच.
आयुष्यभर जिने त्याचं अजिबात ऎकलंच नाही, तो शेवटी आयुष्यातूनच निघून जातो. आणि ती जेव्हा त्याच्या अंत्यदर्शनाला येते, तेव्हा त्याच्या निष्प्राण चेहर्‍यावर जणू हेच उमटलेलं असतं-
सुने जाते न थे तुम से मेरे दिन रात के शिकवे
कफन सरकाओ,मेरी बेजूबानी देखती जाओ..

पण आता तिला याचा पश्चात्ताप होतो आहे. त्याला आपण प्रतिसाद दिला नाही याचं प्रचंड दु:ख सोसत ती आयुष्य काढते. तिचाही अंत होतो, आणि जगाचाही अंत होतो. मग प्रलयाचा दिवस (महशर) येतो. या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापापुण्याचा हिशोब होतो. जीवनभराच्या कृत्यांचा हिशोब लावून त्या त्या नुसार माणसाला स्वर्गात पाठवायचं का नरकात-याचा निवाडा केल्या जातो.
पण हे काय ? ती इथे चक्क गप्प बसून आहे. इतकंच नाही, तर तिच्या चेहर्‍यावर प्रचंड अपराधीपणा दिसतो आहे.पश्चात्ताप ( पशेमानी ) दिसतो आहे. नेहमीच आनंदाने रहाणारी ती-आता अशा अवस्थेत पाहून तिचा तो प्रियकर-ज्याच्या सांगण्या बोलण्याला तिने आयुष्यभर जुमानले नाही- कमालीचा अस्वस्थ होतो. तिथेच तो एक ठरवून टाकतो-
अपने सर ले ली महशर में खताएं उनकी
मुझसे देखा न गया उनका पशेमां होना

निस्सीम प्रेम याहून काय उत्कट असू शकतं…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

शायर लोकांचे प्रेमाचे व्यवहार फार जालिम असतात. सामान्य माणसासारखं त्यांचं प्रेम काही असं तसं नसतं. जीवन मरणाच्या नुसत्या बाता मारणारे ते वादे-इरादे नसतात,तर कृतीत उतरवून दाखवायची धमक त्यात असते.आणि या शायर लोकांना प्रेयस्या ( वा! काय छान अनेक वचन आहे !) तशाच अगदी जालीम-अगदी जीवघेण्या असतात. एका शायरच्या नशिबाला अशीच एक जीवघेणी प्रेयसी लाभली. तिच्या, ‘निघून जा !’अशा सांगण्याचा एवढा असर त्याच्यावर झाला,की दुसर्याज दिवशी मोठ्या बाका प्रश्नाला उत्तर द्यायची वेळ त्याच्यावर आली-
जनाजा रोक कर मेरा,कुछ इस अंदाज से वो बोले
गली तो हमने कही थी,तुम तो दुनिया छोडे जाते हो
आता हा प्रश्न आपल्यासाठी हसण्याचं निमित्त होतो,त्याच्यासाठी जिव्हारी लागणारा असा.(पण जीवच गेला तर जिव्हार कुठे रहाणार..) आणि माणसाचं जाणं-निघून जाणं असंच तर असतं-सांगणारा असतो,ऎकणारा मात्र निघून गेलेला असतो. ‘अमर’मध्ये म.रफीने गायलेलं एक आर्त असं गाणं आहे-‘ओ दूर के मुसाफिर हमको भी साथ ले ले..’ शकील बदायुनीच्या या गीतामध्ये सुरूवातीला एक शे’र आहे-
चले आज तुम जहां से,हुई जिंदगी पराई
तुम्हे मिल गया ठिकाना,हमे मौत भी ना आई
आलेला माणूस हा जाणारा असतोच. बुलावा आला की त्याला निघावं लागतं,जावं लागतं. पण हे त्याचं जाणं केव्हा असतं-जेव्हा त्याला बोलावणं आलेलं असतं तेव्हा.
पण जवळचा माणूस जातो,तेव्हा आपल्याला का कोण जाणे वाटत रहातं, त्याने इतक्या लौकर जायला नको होतं.त्याने जायची घाई केली…जसं काही त्याला बोलावणं आलं नव्हतं,तोच निघून गेला.आपण होवून निघून गेला.रुग्णाची विचारपूस करायला आपण जातो.त्याच्याशी बोलतो.त्याला बरंही वाटतं. चार सुख दु:खाच्या गोष्टी होतात. प्रकृतीबद्द्ल सांगताना तो सांगून जातो,की फार अशक्त वाटतं आहे, उठायलासुध्दा होत नाही,तेवढी शक्तीच नाही राहिली.त्याला धीर देवून आपण त्याचा निरोप घेतो.
आणि सकाळी निरोप येतो, तो गेल्याचा. आपण सुन्न होतो. कालची विचारपूस आठवत रहाते. आपलं एक मन मग राहून राहून त्याला उद्देशून म्हणत असतं-
कल तो कहते थे,के बिस्तर से उठा जाता नही
आज दुनिया से निकल जाने की ताकत आ गई…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

2010 in review

The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:

Healthy blog!

The Blog-Health-o-Meter™ reads Wow.

Crunchy numbers

Featured image

A Boeing 747-400 passenger jet can hold 416 passengers. This blog was viewed about 7,800 times in 2010. That’s about 19 full 747s.

 

In 2010, there were 59 new posts, growing the total archive of this blog to 61 posts. There were 29 pictures uploaded, taking up a total of 12mb. That’s about 2 pictures per month.

The busiest day of the year was March 8th with 155 views. The most popular post that day was तेरा हाथ हाथ में आ गया.. .

Where did they come from?

The top referring sites in 2010 were mail.yahoo.com, marathiblogs.net, hasanyachaaakar.wordpress.com, Private networks, and mr.wordpress.com.

Some visitors came searching, mostly for madhukar dharmapurikar, jaanibemanzil.wordpress.com, jaanibemanzil, and http//jaanibemanzil.wordpress.com.

Attractions in 2010

These are the posts and pages that got the most views in 2010.

1

तेरा हाथ हाथ में आ गया.. March 2010
6 comments

2

तू हो जमीं पे और तेरी सदा आसमानों में… February 2010
16 comments

3

About October 2007
1 comment

4

नातेसंबंधातली शुगर May 2010
9 comments

5

दिवाना ! May 2010
9 comments

Read Full Post »

खबरदार

नूतन वर्षाच्या शुभेच्छा !

Past is History.Future is Mystery and Present is Gift;that is why we call it as ‘Present’ !
कळतं पण वळत नाही अशी माणसाचे गत असते. सुखाच्या मागे बावळटपणाने आपण लागलेलो, दु:ख आलं की गडबडून जातो आणि अशाच तर्‍हेची धावपळ आयुष्यभर करणारे आपण : जेव्हा कुणी वडिलधारा, शहाणासुरता माणूस आपल्याला आपल्या अशा बालिशपणाची जाणिव करून देतो, आपल्या वागण्यातली विसंगती दाखवून देतो, तेव्हा आपण थबकतो. लाजतो-बुजतो. विचार करतो. आपल्याला ते पटून जातं.

आपल्या उर्जेचा-शक्तीचा बराचसा हिस्सा हा आपण आपल्या भूतकाळाभोवती तरी विणलेला असतो किंवा भविष्यकाळा कडे जाळं लावण्यात खर्च केला असतो. मग हाती जे लागतं ते बर्‍याच अंशी दु:ख, निराशा असंच असतं. वर्तमानात- या क्षणात रहायला शिकलं तर आपण आपली अनावश्यक खर्च होणारी शक्ती वाचवू शकतो.

आपल्या क्षणाबद्दल -आत्ताच्या क्षणाबद्दल सावध राहून जगायला संतांनी सांगितलं आहे,पश्चिमेच्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे…पूर्वेच्या कलावंतांनी सांगितलेलं आहे-
तू अगर अपनी हकीकत से खबरदार रहे
न सिया-रोज रहे,फिर न सिया-कार रहे

– डॉ.इक्बाल

आपल्या वर्तमानाशीच तू जर संबंधीत राहिलास,वर्तमानाचं तुला स्पष्ट असं भान असेल,तर मग तुझ्यासाठी अशुभ दिवस रहाणार नाही, कसलंही पाप रहाणार नाही…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »