Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for डिसेंबर, 2010

‘साहिर’ लुधियानवी आणि ‘शकील’बदायुनी. उर्दू भाषेतले हे उत्तम कवी,साहित्त्यिक. मग ते सिनेसृष्टीत आले. सिमेमांसाठी त्यांनी गाणी लिहिली. असं गाणं लिहिताना, शायरपेक्षा थोडी वेगळी तबियत पाहिजे असते, ती त्यांनी आत्मसात केली. प्रसंगानुरुप, संगीत-चालीच्या अनुरूप शब्द रचना करताना, त्यांच्यातला शायर थोडा नाराजही होत असावा, त्याला गंमतही वाटली असावी.
सिनेमात मुजरा हा गाण्याचा प्रकार लोकप्रिय असतो. कोठीवर नायक आलेला असतो,नशेत असतो, त्या नशेत त्याला संसाराच्या विवंचना,अपराधी भावना अधिक भडक तर्‍हेने जाणवत असतात. आणि याच भडक संवेदनांना घेवून मुजर्‍याची शब्द रचना-संगीत रचना आयोजीत केलेली असते. आयुष्यातल्य़ा सुख दु:खाचा तो एक बाजारच मांडलेला असतो- रंजनाच्या,करमणुकीच्या रुपात.
आता आयुष्याबद्द्ल भाष्य करायचं तर असतं,पण ते कवितेच्या-नज्मच्या स्वरूपात न करता त्याला सादरीकरणाचं रूप द्यायचं असतं. अशावेळेस जातीवंत शायरला शब्दांची एकप्रकारची नशा चढते आणि तो व्यक्त होतो. एका अर्थाने सांगायचं झाल्यास सुख दु:खाचा झणझणीत रस्सा असलेलं हे गाणं असतं. सारंगी आणि तबल्याचा ठेका ही वाद्यं तर त्या तवायफसोबत असणार्‍या गडीमाणसांसारखी असतात. सुख दु:खाला सहमतीची, होकार-नकाराची संगत करणारी ही वाद्यं म्हणजे मुजर्‍याचे जीव प्राण.
‘गंगा जमुना’मध्ये शकीलने ‘माणूस’कसा धोकेबाज असतो, ते सांगितलं आहे-
जहां मे हो जिसे जीना, वो तुझसे दूर रहे,
जो मरना चाहे, वो आकर तेरे हुजूर रहे
आणि ‘बहूबेगम’मधल्या मुजर्‍यातली ही आर्तता पहा-

बरबादे वफा का अफसाना,हम किससे कहें और कैसे कहे
खामोश है लब, और दुनिया को अश्कों की जुबां मालूम नही

एवढं असलं तरी आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लाभलेलं असतं या मुजर्‍याला-
मनात तीव्रतेने दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी जोरदार तरीकाच हवा असतो. त्याच सोबत त्या दु:खाकडे हसून पहायची बेमुर्वत धुंदी.

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

माणसाचे बाहू म्हणजे त्याच्या कर्तृत्त्वाचे मह्त्त्वाचे साधन. या बाहूंचं बळ ( जोरे-बाजू) माणसाला,त्याचं ध्येय मिळवून देतं; यश मिळवून देतं. पण हे जे बाहू असतात-जोमदार बैलांसारखे, त्यांना सावरणारा ,हांकणारा गाडीवान तेवढाच जोमदार हवा. मनच भक्कम नसेल तर बाहूंकडे हात चोळण्याशिवाय दुसरं काय रहाणार ? एखादे संकट आले-अडचणींच्या पिंजर्‍यात  कधी आपण बंदिस्त झालेलो असतो; तेव्हा जोरे-दिल,जोरे-बाजू व्यवस्थितरित्या कार्यरत राहिले नाहीत तर आयुष्य कठीण होवून बसतं. माणूस पायाने कमी चालतो,मनाने जादा. बंदिस्त(सवयीचा?) माणूस तर स्वातंत्र्याच्या अफाट कल्पना करतो. विजयाच्या-उन्मादांच्या भावनांनी बेभान होतो, पण बसल्या बसल्याच. बसून केलेली अशी बगावत (बंड) निष्प्रभ असते.

खामोश बगावत से कटती नही जंजीरे
जुगनू से शबिस्तां का जादू कभी टूटा नही
( शबिस्तां : रात्री रहाण्याचे ठिकाण, शयनागार)
इथं,आपल्या मर्यादेच्या विचारांत एकदा का गुंतून पडलं,की आपल्या क्षमतांचा विसर पडत जातो. मागे पुढे पहाणे,काल्पनीक पराभवाच्या शंकेने मग नशिबाला दोष लावणे, तक्रार करणे-प्रार्थना करणे या चक्रात माणूस सापडतो.मान्य आहे संकट कठीण आहे ; पण त्याबद्दल तक्रार करायच्या ऎवजी जरा प्रयत्न करून पहा .आपल्या बाहूतलं बळ काय,हे तर आजमावून पहा गड्या-

जोरे-बाजू आजमां,शिकवा न कर सय्याद से
आज तक कोई कफस टूटा नही फर्याद से

मग या मन:स्थितीच्या-परिस्थितीच्या रेट्यातून असे काही क्षण येतात,त्यावेळी आपले बाहू फुरफुरतात ( पराभव-अन्यायाच्या कल्पनेत केलेल्या विचारांचा दाह असह्य होवू लागला तेव्हा) मग आपल्याकडून प्रयत्न केले जातात.या प्रयत्न-संघर्षात एक नाजूक वेळ येते. क्षणिक पराभवाची. जोरदार शत्रूला मारलेली धडक-पहिलीच धडक कामियाब कशी होईल ? फक्त छन्न ! आवाज होईल-हातोडा मागेच उचलला जाईल. पण इथे, ‘जमत नाही गड्या’असं म्हणणं मूर्खपणाचं नाही का? अहो,बंदूकीची प्रत्येक गोळी,धनुष्याचा प्रत्येक बाण हा लक्ष्याला लागावाच असा आग्रह धरणं,तो नाही लागला तर आयुध फेकून देणं… आततायीपणाचं नाही का ?

ये लाजमी नही के सभी तीर हो खता
फेंकी है अपने हाथ से तू ने कमान क्यूं

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

खामोशी

मुझे इ न्कार ही कर दे मगर कुछ गुफ्तगू तो कर
तेरा खामोश सा रहना मुझे तकलीफ देता है .
..

गप्प रहाणं,गप्प बसणं  आणि मौनात रहाणं, स्तब्ध-शांत,निरवतेत रहाणं या दोनही अवस्थांत फरक आहे का नाही. आहे. सूक्ष्म असा फरक आहे. पण या दोनही अवस्थांना एकच मात्रा लागू आहे,एकच शब्द योजलेला आहे-खामोश.खामोशी…

संतापून जावून आपण एखाद्यावर ओरडतो-खामोश ! समोरचा माणूस गप्प होतो. खामोश होतो. पण खरोखरच का तो खामोश झालेला असतो ?
पण खरोखरची खामोशी ही खरंच खामोशी असते का बरं ? आपण खरंच शांत कधी असतो का- आतून आतून अगदी निरव अशी शांतता खरंच आपल्याला अनुभवता येते का बरं…
खामोश न था दिल भी,ख्वाबीदा न थे हम भी
तनहा तो  नही गुजरा, तनहाई का आलम भी
( ख्वाबीदा: – झोपलेला )

तनहाई-एकलेपण असलं की आपण तसं पाहिलं तर शांत असतो,खामोश असतो. पण असं असलं तरी ते खर्‍या अर्थाने एकलेपण नसतंच.
खामोशीचे कायदे कानून वेगळे असतात. नुसतं शांत रहाणं म्हणजे जसं खामोशी नसते, तसंच इथे कोणताही शोर,आरडा ओरडा ‘गैर कानूनी’असतो. दुसरी बाजू अशी,की आणीबाणीच्या परिस्थीतीत गप्प रहाणं आवश्यक असतं,तिथे आवाज उठविणं चुकीचं,आततायीपणाचं होवू शकतं. एका शायरने म्ह्टलं आहे-
खामोशियोंके दश्त में,क्यूं चिखते हो तूम
कानून सब यहां के सदा के खिलाफ है
( दश्त :  जंगल      सदा : आवाज,हांक  )

…पण दश्त म्हणजे आणीबाणी नाही. जंगलाची शांतता अनुभवायची असेल, तर इथले संकेत इथले नियम पाळायला हवेत. महत्त्वाचा आणि प्राथमिक नियम म्हणजे आपण कुणाला ही साद घालायची नाही, बोलवायचं नाही. आपण अनुभवायची  असते  ती  शांततेची वनराई….
पण या खामोशीचे अनेक अर्थ अनेक जण आपापल्या परीने लावीत असतात. ‘जिगर’मुरादाबादी म्हणतो-
उसे सैय्याद ने कुछ,गुल ने कुछ,बुलबुल ने कुछ समझा
चमन में कितनी मा’नीखेज थी, इक खामोशी मेरी
( सैय्याद : शिकारी       मा’नीखेज : अर्थपूर्ण  )

खामोशीने घेरलेल्या माणसाचं निकटचं माणूस त्याची खामोशी पाहून अस्वस्थतेनं घेरून जातं. जवळच्या माणसाचा गप्पपणा पाहून त्याला करमत नाही,राहून राहून मनात निरनिराळे विचार येत रहातात ;  आणि मग न रहावून त्याला सांगावं वाटतं,’मुस्कुराओ के जी नही लगता..’  खरंच, खामोश मुस्कुराहट किती बोलकी असते…आणि ते बोलणंसुध्दा पहात रहावं वाटणारं.
‘कंगन’ मध्ये निरूपा रॉय  हीच तर विनंती करते आहे, गीतकार राजेंन्द  कृष्ण यांच्या शब्दांतून संगीतकार चित्रगुप्तच्या चालीतून, …अशोक कुमारला

: अर्थपूर्ण )

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »