प्रेम आंधळं असतं हे दुनियाला ठावूक आहे; पण प्रेम हे वेंधळंही ( किंवा वेंधळंच ) असतं याचे बरेच पुरावे आहेत. एक पुरावा पहा –
सरनामा मेरे नाम का और खत रकीब का
जालिम तेरे सितम के है उन्वां अजब अजब
(सरनाम: -पत्रावरील पत्ता. सितम : जुलूम,अत्त्यचार . उ न्वान : शैली,पध्दती . रकीब : शत्रू,अर्थात प्रेमातला प्रतिस्पर्धी )
…लिफाफ्यावर पत्ता तर माझा आहे. (त्याच्यामुळेच तर पत्र मला मिळालं ना ?) आणि आत उघडून पाहातो, तर काय ! च्यायला, ते तर माझ्या दुष्मनाच्या नावे लिहिलेलं ! म्हणजे,एकाच वेळेस दोन जुलूम झाले माझ्यावर- एक तर तिला दुसरा प्रेमी आहे हे कळालं आणि आता ते पत्र वाचावं तर त्यातला मजकूर वाचता वाचता असं वाट्त आहे, की उन उन पदार्थ-अन तो पण तिखट आग !म्हणजे, ती भेटलीच समजा आणि समजा तिथेच तो ‘रकिब्या’ असला तर ती पाहणार माझ्याकडे अन बोलणार त्याच्याशी ? वा रे वा !
पण हे असं वागणं वेंधळेपणाचं नाही का ? आधीच पत्राची वाट पहाणं म्हणजे अस्वस्थ करणारी बाब ; त्यात असं पत्र ?
मिर्जा गालिब आपल्या प्रेयसीच्या या वेंधळेपणाचा चतुराईने कसा उपयोग करून घेतो पहा –
जिस खत पे ये लगाई, उसका मिला जवाब
इक मुहर मेरे पास है, दुश्मन के नाम की (मुहर :शिक्का,छाप ,सील )
म्हणजे वेंघळेपणाचा उपयोग-माणूस चतूर असेल तर किती चांगल्या तर्हेने करून घेतो पहा. रकीबच्या नावाचा शिक्का करून घ्यायचा,तो लिफाफ्यावर मारायचा अन द्यायचं पत्र पाठवून -आय लव्ह यू ! आणि गंमत म्हणजे त्या पत्राला भरभरून उत्तर मिळालं की !
पण या दोनही शे’र मधून एक दुसरीच खबर मिळते. तिच्या वेंधळेपणाचा इथे संबंध नाही खरं म्हणजे; आणि अर्थात ते पत्र याला आहे, का याच्या रकीबला याचा ही संबंध नाही इथे. प्रेम कुणावर-याच्यावर का त्याच्यावर, छे! नाही हो.
मुळात तिच्या मनात प्रेमच एवढं अपार भरून आहे, की ती पत्रातून धो धो व्यक्त होत असते. तिला काही तरी मनातलं लिहावं वाटतं, ती उत्तेजीत अवस्था मांडण्याची अनिवार ओढ आहे तिच्यात… मग तो वाचणारा कोण – हा मुद्दा किती किरकोळ -नाही का !
please visit another blog : http://hasanyachaaakar.wordpress.com/
मस्त!