Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for नोव्हेंबर, 2010

रोना धोना

वो रुलाकर हंस न पाया देर तक
जब मैं रोकर मुस्कुराया देर तक

हम दोनो’मध्ये साहिरची एक गजल म.रफीने गायली आहे-कभी खुद पे कभी हालात पे रोना आया.. मनात रडू दाटून आलेलं असलं की त्याला निमित्तच पाहिजे असतं. मग कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर रडू येत असतं. या गजलचा एक शे’र आहे-
कौन रोता है किसी और की खातीर ऎ दोस्त
सबको अपनी ही किसी बात पे रोना आया

आपण इतरांची विचारपूस करतो,इतरांच्या दु:खाने आपण दु:खी होतो अशी आपली समजूत असते, केवळ समजूत. खरं म्हणजे,समोरचा माणूस आपलं दु:ख सांगताना आपण ते ऎकत असतो आणि आपण आपल्या तर्हेडने दु:खी होत असतो. स्वत:च्या बाहेर जायला तयार नसणारे आपण अशा रीतीने आपल्याच सुख द:खात मश्गूल होवून बसलेले असतो.
मोठ्या मनाची माणसं..त्यांचं सुख-दु:ख मात्र स्वत:पुरतं कधीच नसतं. त्यांनाही दु:ख असतं, पण त्यांचं दु:ख विस्ताराचं असतं. अपार करूणा भरलेली असली, की माणसाला रडू फुटतं ते अगदी वेगळ्या कारणामुळे. डॉ इक्बाल यांना रात्रीच्या चमचमणार्याम तार्यांतची शांतता,त्यांचं ते गप्प रहाणं फार अस्वस्थ करीत असतं.
रुलाती है मुझे रातों को खामोशी सितारों की
निराला इश्क है मेरा, निराले मेरे नाले है

रडणं हे वाईट,अशूभ असतं, ते नेभळ्या माणसाचं काम असतं असं सहसा म्हणल्या जातं. रडण्यापेक्षा हसत हसत संकटांना सामोरे जा-रडगाणं काय गात बसता असं रडणार्या वर वैतागणारे काही कमी नाहीत.
पण याला अपवाद प्रेमात पडल्यावरचा. प्रेमातलं सुख प्रेमातलं दु:ख त्यालाच कळतं, ज्याला त्या प्रेमाची झीज सोसावी लागते,जो स्वत:ला प्रेमात उगाळून घेत असतो. त्याला रडणं म्हणजे गैर आहे असं वाटत नसतं. उलट रडण्याचं तो समर्थन करीत असतो. त्याला सांगायचं असतं,की अरे बाबा,रडण्यामुळे तर माणूस धुवून निघतो,स्वच्छ होवून जातो.मोकळेपणाने रडायलासुध्दा आज कुणाला जमतं? उलट रडू आवरून,रडू लपवून माणूस कुढत रहातो, कुजत रहातो.
गालिब म्हणतो-
रोने से और इश्क में बेबाक हो गए
धोए गए हम ऐसे के बस पाक हो गए

धो धो रडून,आंघोळ केल्यासारखं स्वच्छ होवून जायची, पवित्र व्हायची कल्पनाच किती छान आहे. आणि प्रेम व्यवहारात सगळे राग लोभ,आशा निराशा, सुख दु:ख सांगून मोकळं होणारा माणूस… त्याचं रडणं जेवढं मोकळं असतं,तेवढंच त्याचं त्या रडण्यानंतरचं हसू… सूर्यप्रकाशासारखं निर्मळ असतं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गालीबच्या या गजलला एवढी सुरेख चाल दिली आहे,लताने ही गजल एवढ्या निरागस आनंदाने म्हटली आहे, की-
रडण्याचा सुध्दा मोह पडावा…


please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

प्रेम आंधळं असतं हे दुनियाला ठावूक आहे; पण प्रेम हे वेंधळंही ( किंवा वेंधळंच ) असतं याचे बरेच पुरावे आहेत. एक पुरावा पहा –

सरनामा मेरे नाम का और खत रकीब का
जालिम तेरे सितम  के है उन्वां अजब अजब
(सरनाम: -पत्रावरील पत्ता. सितम : जुलूम,अत्त्यचार .  उ न्वान : शैली,पध्दती
. रकीब : शत्रू,अर्थात प्रेमातला प्रतिस्पर्धी  )
…लिफाफ्यावर पत्ता तर माझा आहे. (त्याच्यामुळेच तर पत्र मला मिळालं ना ?) आणि आत उघडून पाहातो, तर काय ! च्यायला, ते तर माझ्या दुष्मनाच्या नावे लिहिलेलं ! म्हणजे,एकाच वेळेस दोन जुलूम झाले माझ्यावर- एक तर तिला दुसरा प्रेमी आहे हे कळालं  आणि आता ते पत्र वाचावं तर त्यातला मजकूर वाचता वाचता असं वाट्त आहे, की उन उन पदार्थ-अन तो पण तिखट आग !म्हणजे, ती भेटलीच समजा आणि समजा तिथेच तो ‘रकिब्या’ असला तर ती पाहणार माझ्याकडे अन बोलणार त्याच्याशी ?  वा रे वा !
पण हे असं वागणं वेंधळेपणाचं नाही का ? आधीच पत्राची वाट पहाणं म्हणजे अस्वस्थ करणारी बाब ; त्यात असं पत्र ?

मिर्जा गालिब आपल्या प्रेयसीच्या या वेंधळेपणाचा चतुराईने कसा उपयोग करून घेतो पहा –

जिस खत पे ये लगाई, उसका मिला जवाब
इक मुहर मेरे पास है, दुश्मन के नाम की
(मुहर :शिक्का,छाप ,सील )
म्हणजे वेंघळेपणाचा उपयोग-माणूस चतूर असेल तर किती चांगल्या तर्‍हेने करून घेतो पहा. रकीबच्या नावाचा शिक्का करून घ्यायचा,तो लिफाफ्यावर मारायचा अन द्यायचं पत्र पाठवून -आय लव्ह  यू ! आणि गंमत म्हणजे त्या पत्राला भरभरून उत्तर मिळालं की !

पण या दोनही शे’र मधून एक दुसरीच खबर मिळते. तिच्या वेंधळेपणाचा इथे संबंध नाही खरं म्हणजे; आणि अर्थात ते पत्र याला आहे, का याच्या रकीबला याचा ही संबंध नाही इथे. प्रेम कुणावर-याच्यावर का त्याच्यावर, छे!  नाही हो.

मुळात तिच्या मनात प्रेमच एवढं अपार भरून आहे, की ती पत्रातून धो धो व्यक्त होत असते. तिला काही तरी मनातलं लिहावं वाटतं, ती उत्तेजीत अवस्था मांडण्याची अनिवार ओढ आहे तिच्यात… मग तो वाचणारा कोण – हा मुद्दा किती किरकोळ -नाही का !

please visit another  blog :       http://hasanyachaaakar.wordpress.com/

Read Full Post »

 

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
***
वेदनेच्या भयाने विव्हळणारा माणूस पुढे भयाच्या वेदनेने विव्हळत रहातो असं कुण्या देशातल्या कुण्या भाषेतल्या माणसाने कुण्या काळात लिहून ठेवलेलं-अन् त्याचे प्रतिध्वनि माझ्या मनात उमटत जातात अन मी तपासाला लागतो- मी कशामुळे त्रस्त आहे…द:खाच्या काळजीने का काळजीच्या दु:खाने… एखादा मनोरूग्ण बसल्या बसल्याच थरथर कापावा,कण्हावा-कुंथावा तसं माझं मन दैनंदिन व्यवहारांच्या वर्दळीत उगीचच बाजूल होतं, उगीचच कण्हत रहातं.खरं म्हणजे, आत्ता-आत्ता काही घाबरण्यासारखं नसतं,काळजीचं नसतं.सगळं एका परीने आलबेल असतं.पण-

न राहे सख्त होती है,न मंजिल दूर होती है
मगर अहसासे-नाकामी,थका देता है राही को
( अहसासे-नाकामी : निराशेची भावना,पराभवाची जाणिव)

समस्या तेवढ्या अवघड नसतात.संकटं तेवढी घेरलेली नसतात.धैर्याने-धीराने तोंड दिलं, तर त्यातून सहज बाहेर पडूही शकतो…पण पडलो नाही बाहेर तर? …हा प्रश्न पाऊलच उचलू देत नाही ना. उत्साहाच्या ‘रिडींग’चा काटा झिरोच्या पुढे हटायलाच तयार नसतो की.
निराशेच्या,पराभवाच्या फाजील विचारांत गुंतून पडलं,की असं होतं. वाटतं,की शक्यच नाही,सगळीकडे अंधारच आहे.
पण हे सगळे मनाचेच खेळ. मन तशा विचारानं भारून गेलं,की शरीरावर मळभ साचणार.

आणि याच मनावर उत्साहाचा अंमल झाला-प्रकाशाच्या विचारांचा असर झाला,की ढगाची सावली जावून सगळ्या परिसरावर सोनेरी उन पडावं तसं शरीर मोहरून उठतं…

कुछ कफस की तिलीयों से छन रहा है नूर सा
कुछ फिजां,कुछ ताकते-परवाज की बातें करो
( कफस : सापळा,पिंजरा,देह.. नूर :प्रकाश. ताकते-परवाज : उड्डानाची इच्छा-शक्ती )

आणि खरंच,प्रकाशाचे स्वागत केले,की शरीर मनात तो उमटतोच उमटतो :

दिल रोशन,तेरा मन रोशन तो जहां ss रोशन !

Please visit another blog –http://hasanyachaaakar.wordpress.com

*******

 

 

 

Read Full Post »