वर्गात शिकविणारे एखादे शिक्षक जरबेचे असतात.त्यांच्या विद्वात्तेचा,त्यांच्या शिकविण्याचा प्रभाव आपल्यावर असतो,त्यांच्याबद्दलचा आदर सदैव मनात भरून असतो. पण एक ढ आणि व्रात्य पोरगा आपल्या मनात सदैव मागच्या बाकावर बसलेला असतो.धडा समजून थेन्यापेक्षा न घेण्याकडेच त्याचा कल असतो. ..अतिरिक्त प्रभावाच्या दडपणापासून सुटका मिळविण्याची त्याची ही धडपड.समोरची मुलं अध्ययानात मग्न झालेली असताना,मागच्या बाकावरचा हा व्रात्य पोरगा अंगवळणी पडलेल्या त्याच्या सवयीत मश्गुल असतो-विडंबनाची त्याची सवय.
डॉ.इक्बाल यांची भरदार शायरी,भक्कम उपदेश,शब्दांतला तो दरारा त्याचबरोबर वर्गाताल्या मुलांबद्दल असावा, तसा ‘माणसा’बद्दल असलेला जिव्हाळा.त्यांच्या काव्याचा प्रभाव जीवनभर साथ देणारा. पण ते एवढ काव्य समजायला- पेलायला,’जज्ब’व्हायला आपली क्षमता तोकडी पडते की काय अशा भावनेचा अंमल कधी चढतो आणि मग त्याच वेळेस मनाच्या मागच्या बाकावर बसलेल्या त्या व्रात्त्य पोराच्या चाळ्यांकडे लक्ष जातं.
तरूण वयात तत्त्वांबद्दल-उपदेशांबद्द्लचं जे आकर्षण असतं,त्यात रोमांच असतो,तसा माझ्यातही होताच. त्याच दिवसांत डॉ.इक्बाल यांचे शे’र वाचून विलक्षण असा थरार मनात उमटायचा.त्या भरात,त्यांचे अवघड शब्दांचे अर्थ-अक्षरश: आक्रोड फोडून गर खावा,तसं शोधून घेवून समजावून घेतले-
तू ने ये क्या सितम किया मुझको भी फाश कर दिया
मैं ही तो एक राज था, सिना-ए-कायनात में
इक्बाल यांची ईश्वराबद्द्लची तक्रार मशहूर आहे. ईश्वराला उद्देशून ते म्हणतात, ‘ तू हा काय माझ्यावर अन्याय (सितम) केलास-मलासुध्दा प्रकट (फाश) केलंस !(जन्माला घातलंस !) या विश्वाच्या उदरातलं रहस्य म्हणून मीच होतो. (तू जन्माला घातलं नसतंस, तर विश्वाच्या रहस्याचाच एक भाग बनून मी राहिलो नसतो का?)
तरूणपणातल्या त्या दिवसांत जीवनव्यवहाराचे ट्क्के टोणपे खाण्यापूर्वीच मला या तत्त्वांचा परिचय झाला आणि कुशाग्र पोराच्या चेहर्यावर कधी मूढता वाढते, तसं झालं.तो-तो व्रात्य पोरगा.त्याच्या उच्छादाकडे लक्ष गेलं.त्याच्याबद्द्ल अजिबात तक्रार नसते. सत्त्याचं रूप थट्टेच्या अंगानं पाहिल्यावर हुशारीची ती अतिरीक्त मूढता कुठल्या कुठे पळून जाते. या शे’रची थट्टा मी नेहमीच ‘एंजॉय’करतो :
याच दिवसांत मला व्यंगचित्रं काढायचा छंद लागला होता. एकदा या ‘फाश’वाल्या शे’रसाठी मी एक व्य़ंगचित्र काढलं होतं- अंधाराची पार्श्वभूमी. रस्ता -त्यावर लाईटचा खांब,हॅट घातलेला बल्ब अन त्या प्रकाशात एक पोलीस एका चोराला हातकड्या घालून घेवून जातो आहे…नाराज झालेला तो चोर, ( बहुदा इक्बाल यांचा वाचक असावा) हा शे’र ऎकवितो आहे त्या पोलीसाला !मध्य रात्रीचं वातावरण, अंधारात चोरी करून पळून जाणार्या त्या चोराला या पोलीसाने पकडून ‘प्रकाशात’आणले आहे,आणि चोराची ही नाराजी !
मी काढलेल्या या व्यंगचित्रामुळे मला त्या शे’रचा खरा अर्थ समजला,आणि कायम लक्षात राहिला.
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
Maazi ek [atyant] chhoti kavita aahe.
Mazyat mi,
Tyaat mi,
Aat mi,
shodh ghetoy
mazaa mi.
Ase anek raaj aplyach ‘seeneme’ daphn astaat. Akherees raaaj konata ughadto he kunaachya [ martya mansachya] hatat nasate.
Blog bara vatala.
once one reads iqbal he is bound to become fan of him !
your thoughts are relevent and readable. sangeeta joshi.