Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जुलै, 2010

क़ॅनडा येथे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्हायचे,त्या प्रदर्शनातले हे एक परकीय व्य़ंगचित्र. साध्या रेषांनी इथे एक माणसाचा आकार तयार झालेला आहे. हा माणूस धावतो आहे. याच आकाराच्या मध्ये आणखी एक आकार आहे, तो माणसाचाच आहे, तोही धावतोच आहे-मात्र उलट्या दिशेने धावतो आहे. त्याच्यातही एक माणूस-धावणारा;पण तो सुलट्या दिशेने…
शरीराच्या आकाराकडे थोडं थांबून ( म्हणजे आपण !) पाहिलं,की लक्षात येतं,हा एकच माणूस आहे. शरीराने एका दिशेने,तर मनाने दुसर्‍या दिशेने धावणारा. परस्पर विरोधी विचार-भावनांचा कल्लोळ बाळगून अस्थीर झालेला माणूस…आपण सर्वजण.
म्हटलं तर ही समस्या,म्हटलं तर ही प्रकृती. या स्थितीकडे गमतीनेही पहाता येतं,गांभीर्यानेही. डॉ.इक्बाल आणि मिर्झा गालिब;उर्दू शायरीतले हे महान कवी. माणसाच्या मनतली चलबिचल अस्वथता,याचा शोध घेवून अर्थ लावणारे डॉ.इक्बाल,तर ती स्थिती स्विकारून त्याकडे गमतीने पहाणारा गालिब.
डॉ.इक्बाल म्हणतात

ढूंडता फिरता हूं मै ऎ ‘इक्बाल’अपने आपको
आप ही गोया मुसाफीर,आप ही मंजील हूं मै
( गोया : जसं काही…)

… आणि मिर्झा गालिब चा शे’र आहे-

खुदाया ! जज्बा-ए-दिल की मगर त’आसिर उलटी है
के जितना खेंचता हूं,और खिंचता जाए है मुझसे
( जज्बाए दिल :ह्रदयाचे आकर्षण,प्रेम तासीर : गुणधर्म, प्रभाव )

…काय सांगावी या प्रेमाची गंमत ! सगळंच उलटं होतं आहे, इथे. तिच्यापासून दूर जाण्याचा मी जेवढा प्रयत्न करतो आहे, तेवढाच ओढ्ल्या चाललो आहे की तिच्या कडे !

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

एखाद्या कलावंताची निर्मिती त्याने(अन त्यानेच )मांडली तर त्याच्या सांगण्या-बोलण्या-वागण्याला एक सूर येतो;त्याला हवा असणारा.त्याला अभिप्रेत असणारा सूर. पण त्याची निर्मिती इतरांकडून अभिव्यक्त झाली तर…. वानरीचे मूल तिच्या हातून दुसरी वानरी हिसकावून घेते;त्याचा लाड-प्यार करतानाच तिसरी वानरी ते मूल तिच्याकडून हिसकावून घेते-गोंजारण्यासाठी, कुरवाळण्यासाठी.अशा तर्‍हेने  वानरीचे ते मूल झाडावरच्या अनेक वानरींकडून प्रेमाने,कौतूकाने हाताळल्या जातं.कुरवाळल्या जातं.
कलावंताची निर्मिती ही अशीच. विशेषत: त्याची गीत रचना. शब्दांमध्ये जादू बांधून तो कलावंत निघून गेलेला असतो आणि वेगवेगळ्या पिढीतला माणूस, स्त्री, गायक, संगीतकार, वादक असे कितीतरी जण ते शब्द घेवून मिरवीत असतात. आपल्या भावना, आपली सुख दु:खं,त्या शब्दांच्या आधारे जुळवून घेत रहात असतात. सुख दु:खाचे स्वरूप तेच असले तरी, पिढी निहाय, वयनिहाय्,स्वभावनिहाय त्या सुख दु:खाची अभिव्यक्ती विविध तर्‍हेने  होत जाते आणि आपण जरा बाजूला उभं राहून पाहिलं,तर या मिरवणूकीचा वेगळा असा अनुभव आपल्याला लाभतो.
मोठ्या कवींच्या रचना हे त्याचं ठळक उदाहरण. मिर्जा गालिबची एक गजल आहे-
आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जीता है तेरी जुल्फ के सर होने तक

(आह… एक इच्छा-साधी उसाशाएवढी;पण ती ‘असरदार’होण्यासाठी-परिणामकारक होण्यासाठी एक आयुष्य खर्ची घालावं लागतं,असं माझं नशीब;मग तुला वश करून घेण्यासाठी-तेवढा कालावधी माझ्या आयुष्यात कुठे आहे…शिवाय-
हम ने माना के तगाफुल न करोगे लेकिन
खाक हो जाएंगे हम तुमको खबर होने तक
(मान्य आहे,तू मला नाही म्हणणार नाहीस;पण माझ्या प्रेमाची जाणिव तुला होईपर्यंत मी खलास होवून जाईल,त्याचं काय !)
आता गंमत पहा, ही गजल ‘मिर्जा गालिब’या मालिकेत जगजीत सिंहने कशी पेश केली आहे,आणि हिच गजल ‘मिर्जा गालिब’या चित्रपटात( वर्ष: ) सुरैय्याने कोणत्या ढंगात पेश केली आहे. मग गमतीचा प्रश्न असा पडतो,की गालिब आज असता,तर तो कुणाच्या बाजूने राहिला असता-विशेषत: या शे’रच्या संदर्भात-
गमे-हस्ती का ‘असद’,किससे हो जुज मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है सहर होने तक
( दु:खाच्या आयुष्याला इलाज आहे तो केवळ मृत्यूचाच. (त्या मृत्यूची) सकाळ होईपर्यंत शमा वेगवेगळ्या रंगात-ढंगात जळत रहाते-नाही,त्याशिवाय तिला दुसरा उपाय तरी कुठे असतो..)
जगजीत सिंहचा तो गंभीर स्वर, गांभिर्याने,सावकाश गायलेली ही गजल आणि सिनेमातली ती तवायफ-सुरैय्या;तिने याच गजलला दिलेला खेळीमेळीचा, समजूतीचा फुलोरा… शब्द तेच,आशय तोच; पण अभिव्यक्तीच्या तर्हाा वेगळ्या,
रंग वेगळे.( अर्थात इथे नसरूद्दीन शहा,सुरैय्या यांच्या अभिनयाचा-चित्रीकरणाचा मुद्दा विचारात घेतला नाही,ती अभिव्यक्ती हा आणखी स्वतंत्र आणि मह्त्त्वाचा भाग आहे)

जाता जाता : ‘लोलक’ हा शब्द ‘लोला’पासून तयार झाला असावा. ‘लोलक’म्हणजे, दागिण्यातला लोंबता मणी;आणि ‘लोला’म्हणजे, घंटेमधला लंबक. भक्ताच्या सुख दु:खाची तीव्र-कोमल अवस्था,मंदिरात प्रवेश करताना, त्याच्या हातून-घंटेच्या नादस्वरातून जाहीर होत असते.
एखादी गजल, गाणारा-सांगणारा-अभिव्यक्त करणारा,आपल्या तर्हे’ने जेव्हा सादर करतो, तेव्हा-गजल तीच असते पण- त्या गजलमधले ध्वनी तसतशा तर्‍हेने उमटत जातात- आपल्या मनाच्या गाभार्‍यात…

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »

मर्दूमशुमारी-खानेसुमारी,जनगणना ही राजाची गरज असते,राज्याची गरज असते. सामाजिक जीवनाचा एकंदर आवाका ध्यानात येण्यासाठी संख्याबळ जाणणं गरजेचं असतं. मग प्रशासन कामाला लागतं. माणूस माणूस मोजला जातो, त्याची स्थिती गती, अवस्था याचा आढावा घेतल्या जातो. त्याच्या भल्यासाठी ज्या काही योजना करायच्या असतात त्याची तयारी करता येते.
पण माणूस – तो कितपत तयार असतो अशा खानेसुमारीच्या कार्यवाही साठी ? लोकशाहीत माणूस स्वतंत्र असतो. त्याला त्याचं मत मांडण्याची मुभा असते. त्यावेळी असा माणूस प्रशासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागीही होतो, मतही मांडतो.
पण जिथे लोकशाहीचं राज्य नाही, जिथे राजा बोले-दळ  हाले, अशी अवस्था असते, जिथे आणीबाणी सदृश्य स्थिती असते, तिथे सामान्य माणूस- त्याला स्वत:चं मत जाहीर करायला भीती वाटत असते. अशा स्थितीत मर्दूमशुमारीच्या कार्यवाहीत तो आपल्याबद्द्ल अशी माहिती देतो-

अब के मर्दूमशुमारी मे मैंने
बेजूबानी, जूबान लिखवाई
नाव-गाव-पत्ता देताना, जेव्हा भाषा-मातृभाषा विचारली जाते, तेव्हा नकळतपणे तोंडातून निघून जातं : जूबां ?…बेजूबानी…

जातीय तणाव,मतभेद द्वेष असं वातावरण असेल तर मग माणसाचं वैयक्तिक जीवन विचारूच नका. भयाने
माणूस गारठलेला असतो.एकमेकांवरचा विश्वास खलास झाल्याने, स्वत:ची ओळख द्यायला कचरतो. अशा स्थितीचं वर्णन ‘हरजीत’हा शायर कसा करतो पहा-
फसाद जब से हुए, हमने नही देखी है
किसी के नाम की तख्ती यहां मकानों में

निदा फाजली या शायरला मात्र या मर्दूम शुमारीचा वेगळाच अनुभव आला आहे. या शायरचा प्रस्ताव जर  का प्रशासनाकडे ठेवला, तर प्रशासन चांगलेच अडचणीत येणार यात शंकाच नाही :

हर आदमी में होते हैं,दस बीस आदमी
जिसको भी देखना हो, कई बार देखना

Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com

Read Full Post »