आजच्या पोरांना- तरूण पिढीला नावं ठेवायची सवय पिढ्या न पिढ्या चालूच असते. आपल्या पिढीचा हवाला देवून आजच्या पिढीला नावं ठेवणं किंवा आजच्याच पिढीची माणसं-त्यांनी पुढे जाणार्या पिढीची थट्टा करणं चालूच असतं. ‘आज कल के जंटलमैन, रहते है हरदम बेचैन !’ असं’ला रा ल प्पा’गर्ल म्हणते,तर एकीची धमकी असते-‘हम से नैन मिलाना बी. ए.पास कर के !’ 1963च्या सुमारास ‘दिल्लगी’सिनेमातलं उषा मंगेशकरचं असंच एक गाणं गाजलं होतं-‘ए आज कल के लडके,लिखते ना पढते हैं’. पुढे भारतीय संस्कृतीचा ‘ऑथराईज्ड डिलर’झालेल्या मनोज कुमारने नव्या पिढीवर चांगलीच छ्डी उगारली होती.
पण त्याही पूर्वी,नवीन पिढीबद्दल तक्रार म्हणा किंवा त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्याच होत्या. या प्रतिक्रीया कधी थट्टेने, कधी तळमळीने दिल्या जातात-पिढ्यान पिढ्या…
अकबर इलाहाबादी या शायरने लहान मुलांबद्द्ल अगदी खरी खुरी प्रतिक्रीया ( म्हणजे वस्तूस्थितीची थट्टा ) दिली होती-
तिफ्ल में बू आए क्या मां बाप के अतवार की
दूध है डिब्बे का, तो ता’लीम है सरकार की
( तिफ्ल : शिशू,मूल. बू : लक्षण,चिन्ह. अतवार:पध्द्ती,ढंग,राहाणीकरणी)
आजच्या मुलांमध्ये आईवडिलांच्या संस्कारांची चिन्हं, पध्दती कुठून बरं येणार…(कारण त्यांना) ड्ब्यातलं दूध; तर शिक्षण(पध्दती)हे इंग्रजांकडून मिळतंय ना !’इंग्रजाळलेल्या’त्या काळातल्या वातावरणावर एवढी झणझणीत प्रतिक्रिया याशिवाय कोणती असणार ! इंग्रजांचं शिक्षण आणि डब्यातलं दूध असल्यावर जन्म दिलेल्या मातापित्यांचे संस्कार-त्यांची प्रकृती उतरायला आता मुलांच्या आयुष्यात जागाच कुठे उरली ?
पण कितीही नावं ठेवा,प्रत्येक पिढीची नवी पोरं जुन्या पिढीपेक्षा अधिक हुशार,अधिक बुध्दीमान होत जाणारी;विशेषत: प्रत्येक गोष्ट बुध्दीच्या निकषावर पारखून घेणारी आहे. ( आपलं तसं नव्हतं. वडिलधार्यांनी सांगितलं किंवा शास्त्रात सांगून ठेवलेलं असलं,की पटकन आपण ‘हो’म्हणणार-आपली श्रध्दा बसणार.)
एक हम थे जो हकीकत से बहल जाते थे
आज के बच्चे हकीकत को परखना चाहें ( हकीकत : सत्य,वास्तविक स्थिती,मूलतत्त्व)
आमची पिढी जे आहे त्याचा स्विकार करणारी होती. वस्तूस्थितीला स्विकारून चालणारी होती. श्रध्दाचं सामर्थ्य जाणणारी होती. आजची पोरं वस्तूस्थिती स्विकारण्यापूर्वी त्याची पडताळणी, त्याची पारख करीत बसणारी आहे. श्रध्देच्या बाबतीत तर त्यांचा हट्ट तर काळजी वाटावी ( अर्थात आपल्याला) एवढा विपरीत असतो.
पण ही पारख-मोठी धोक्याचीही असते.श्रध्दा एकदमच बाजूला सारून केवळ तर्क,केवळ विचारांनी भारावलेली पिढी भावनाशून्य केव्हा होवून बसते, त्याची खबर त्यांनाही लागत नाही. श्रध्दा-भावना-आस्था विरहित या तरूण पिढीबद्दल मग मागची पिढी मोठ्या तळमळीने विचारते–
ये किस ने छिन ली, बच्चों के हाथ से मिट्टी
जो कल खिलौने बनाते थे, बम बनाने लगे
… निर्मितीच्या नादातली पिढी जेव्हा विध्वंसाच्या मार्गाने जावू लागली,तर केवढी आफत होईल…
Please visit my other blog at http://hasanyachaaakar.wordpress.com
UTKRANTI..MONKEY TO MAN,MAN TO MONKEY AGAIN…
[…] Author: WordPress.com Top Posts […]
bachchon ke chhote haathon ko chaand sitare chhoone do
Chaar kitaabein padhkar ve bhi him jaise ho jayenge.
Ha sher konacha te please sangal ka?
Lekh khoop avadala.